Have questions?
Patient Education
अचानक दिसायचे बंद होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे दृष्टीचा पडदा निखळणे.
अंडाकृती अशा डोळ्याच्या पोकळीचे बाहेरचे आवरण म्हणजे पांढऱ्या रंगाचे स्क्लेरा .दृष्टीचा पडदा किंवा रेटिना स्क्लेराला आतुन अस्तरासारखा चिकटलेला असतो,त्याला आतुन डोळ्याच्या पोकळीत असलेल्या
जेलीसारख्या व्हिट्रियसचा आधार असतो तर बाहेरुन स्क्लेरा या डोळ्याच्या बाहेरील आवरणाचा. आपण कोणतीही वस्तु बघतो ती त्या वस्तुची रेटिनावर प्रतिमा पडल्यानेच. पण कधी कधी अपघाताने किंवा आपोआप रेटिना आपली जागा सोडुन डोळ्याच्या पोकळीत व्हिट्रियस मधे पडते. त्यामुळे दृष्टीची संवेदनाच नष्ट होते.व डोळ्याला दिसेनासे होते.बरेचदा रेटिना निखळण्याआधी त्यावर बारीक छिद्र किंवा चीर दिसुन येते.
आता रेटिना का निखळते ते पाहू.
टीव्हीवर क्रिकेटच्या मॅचेस चालु झाल्या कि गल्लोगल्ली क्रिकेटच्या खेळाला ऊत येतो.असेल तेवढ्या जागेत चौकार षट्कार मारले जातात.कधीकधी वेगात येणारा चेंडु एखाद्या खेळाडूच्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्याच्या बरोबर डोळ्याला लागतो.अशा प्रकारे मार लागल्याने रेटिना निखळु शकते.अपघातात किंवा मारामारीतही हे घडु शकते.बहुधा त्या डोळ्याला त्वरित दिसेनासे होते. पण कधीकधी महिन्या दोन महिन्यानीही नजर जाऊ शकते.म्हणुन डोळ्याला मार लागल्यावर त्वरित नेत्रतज्ञाकडे जावे व रेटिना तपासुन घ्यावी.दृष्टी चांगली असली तरी हे करावेच कारण क्वचित प्रसंगी मार लागल्यावर रेटिनाचा पडदा पडलेला नसतो तर फक्त जागेवरच फाटलेला असतो. तपासणीत हे वेळीच कळले तर त्या जागी फक्त लेझर ट्रीटमेंट करुन नजर वाचु शकते.अन्यथा कालांतराने फाटलेली रेटिना एक दिवस निखळतेच व मग ऑपरेशन शिवाय पर्याय उरत नाही.
ज्या व्यक्तींना चष्म्याचा जास्त मायनस नंबर असतो त्यांची रेटिना फार नाजुक,विरविरित असते. ती थोड्याशा धक्क्याने किंवा काही न करताही निखळु शकते.म्हणुनच तीनपेक्षा जास्त मायनस नंबर असणाऱ्या सर्व पेशंटनी वर्षातुन एकदा तरी डोळ्यात ड्रॉप घालुन रेटिनाची तपासणी करुन घ्यावी. इथेही रेटिनाला गेलेली चीर किंवा पडलेले भोक वेळीच कळले तर केवळ लेझर करुन नजर वाचवता येते.एकदा का पडदा निखळला कि ऑपरेशनला पर्याय नाही.
डायबेटिसमधे रेटिनोपथी सुरु झाली व वर्षानुवर्ष त्याकडे लक्षच दिले नाही तर कालांतराने रेटिना निखळु शकते.ऑपरेननेही हे दुरुस्त होईल याची काही खात्री नाही.
वृद्धापकाळाने रेटिना कमजोर होऊन निखळु शकते.
मोतीबिंदुचे ऑपरेशन करताना काही गुंतागुंत झाल्यासही रेटिना निखळु शकते.
तसेच काही कारण नसतानाही रेटिना निखळु शकते.
बहुधा रेटिना निखळण्यापूर्वी बरेच वजन उचलल्याचे किंवा खुप धावपळ,प्रवास केल्याचे सांगितले जाते.म्हणुनच ज्यांचा रेटिना मुळातच कमजोर आहे त्यांनी जास्त वजन उचलणे,फार दगदग, शीर्षासन,गर्दीची ठिकाणे, मारामारी हे टाळावे.
तसेच डोळ्यापुढे काळे डाग फिरणे,ढग आल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यासमोर लाईट/ विजा चमकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसली तर त्वरित नेत्रतज्ञास दाखवणे. ही रेटिना निखळण्याची पूर्वलक्षणे आहेत.वेळीच उपचार केल्यास रेटिना निखळण्यापासुन वाचु शकते.
रेटिनल डिटॅचमेंट हा डोळ्याचा अत्यंत गंभीर आजार आहे.त्याचे ऑपरेशन अत्यंत किचकट असुन नंतर पूर्णपणे चांगले दिसण्याची शक्यता फार कमी.
त्यामुळे योग्य काळजी घेऊन हा प्रॉब्लम टाळणेच बरे.
डॉ आफळे आय हॉस्पिटलमधे अनेक पेशंटची वेळीच तपासणी केल्यामुळे लेझर उपचाराने रेटिना निखळण्यापासुन वाचवली आहे व अनेकांचे अंधत्व टाळले आहे.
रेटिनाचा मध्यबिंदु म्हणजेच मॅक्युला.दृष्टीसाठी अत्यंत महत्वपूर्ण बिंदु.यावर वृद्धापकाळात अनिष्ट परिणाम होतो व दृष्टी खराब होते.यालाच मॅक्युलर डिजनरेशन असे म्हणतात.
सुर्यप्रकाशातील अतिनील (UV) किरणांमुळे हा आजार होतो असे समजले जाते.बहुधा अत्यंत धीम्या गतीने नजर कमी होत जाते.पण पुर्ण अंधत्व सहसा येत नाही.
काही वयस्कर व्यक्ती अंधुक दिसत आहे ,विशेषतः वाचायला त्रास होतो म्हणुन तपासायला येतात.पेशंटना वाटत असते की मोतीबिंदु असावा, ऑपरेशन केल की दिसेल.पण इथे मोतीबिंदु नसतोच, मॅक्युलर डिजनरेशन असते. अशा लोकांचे मोतीबिंदुचे ऑपरेशन करुन काहीच फायदा होत नाही.
म्हणुन मोतीबिंदुच्या ऑपरेशनपुर्वी हा आजार आहे का तपासणे आवश्यक असते.ओसीटी मशिनने या आजाराचे निदान करता येते.
सध्यातरी या आजारावर ठोस उपाय नाही.
आजाराच्या अगदी सुरवातीच्या काळात अँन्टी ऑक्सिडंट गोळ्या दिल्या जातात. नजर कमी होत राहिली तर डोळ्यात इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन द्यावी लागतात.त्यानी काही प्रमाणात डिजनरेशनचा वेग कमी होतो. नजरेत सुधारणाही होते.पण आजार कायमस्वरुपी बरा होतोच असे नाही.
अनेक इंजेक्शन द्यावी लागु शकतात.काही पेशंटना त्याचा खूप फायदा होतो.
या आजारामुळे मॅक्युलावर पडदा आल्यास तो ऑपरेशनने काढावा लागतो.
मॅक्युलर डिजनरेशन होऊ नये म्हणुन भरपुर फळे,पालेभाज्या खाव्या. शक्य असेल तर अल्टावायोलेट फिल्टर असलेले चष्मे व गॉगल वापरावे.
मॅक्युलर डिजनरेशन मुळे वाचन अशक्य झाल्यास मॅग्निफाईंग भिंग वापरुन वाचता येते.
डॉ.आफळे आय हॉस्पिटलमधे मेक्युलर डिजनरेशनचे निदान व त्यावर इंट्राव्हिट्रियल इंजेक्शनने इलाज केला जातो.
सर्वसाधारणपणे,चष्म्याचा योग्य नंबर दिला कि मुलांना पूर्णपणे चांगले दिसु लागते.
परंतु एखाद्या मुलाच्या दोन्ही डोळ्याच्या नंबरमधे बराच फरक असतो व तो बरेच दिवस लक्षात आलेला नसेल ,तर ज्या डोळ्याला जास्त नंबर असतो तो डोळा लेझी किंवा आळशी बनतो.( अंब्लायोपिया) व त्या डोळ्याला योग्य तो चष्म्याचा नंबर देऊनही त्या डोळ्याची नजर पूर्ण सुधारत नाही.
अंब्लायोपियाचे कारण जास्त नंबर असलेल्या डोळ्याशी संबंधित मेंदूतील केंद्र निष्क्रीय होते.
चांगला डोळा व खराब( जास्त नंबर असलेला ) डोळा यात जणु शर्यत लागते.चांगला डोळाच सक्षम असल्याने बघायचे सर्व काम करतो. त्यामुळे खराब डोळा दडपला जातो.व निष्क्रीय होतो.
लेझी आय किंवा अंब्लायोपियाची ट्रीटमेंट म्हणजे प्रथम चष्म्याचा अचुक नंबर देणे.व नंतर काही काळ " चांगला डोळा" बंद करुन ठेवणे.
त्यामुळे लेझी किंवा आळशी डोळा ,जो एरवी बघायच काम करत नव्हता, त्यालाच बघणे भाग पडते.त्यामुळे त्याचे मेंदूतील केंद्र क्रीयाशील होऊन दृष्टी सुधारते.
चांगला डोळा बंद केल्यावर पेशंटने कमजोर डोळ्याने जास्तीत जास्त काम केले पाहिजे.डोळ्याचे काही व्यायामही असतात.
किती काळ चांगला डोळा बंद ठेवायचा ते नजर किती कमी आहे त्यावर ठरते.
मूल जितके लहान तितकी झपाट्याने नजर सुधारते.मोठ्या माणसातही हे होऊ शकते.
योग्य इलाज केला तर मुलाच्या डोळ्यात तिरळेपणा असेल तर तोही सुधारुन डोळे सरळ होऊ शकतात.
डॉ आफळे यांनी कित्येक मुलांचे लेझी आय बरे केले आहेत.
ऑपरेशन शिवाय तिरळेपणा घालवला आहे.
डोळ्याच्या पांढऱ्या भागावर एक पातळ अरधपारदर्शक आवरण असते.त्याला कंजंक्टिवा असे म्हणतात.
हवेच्या सतत संपर्कात असलेल्या या ओलसर भागाला इंफक्शन(जंतुसंसर्ग) होण्याची बरीच शक्यता असते.यालाच कंजंक्टिवायटिस किंवा डोळे येणे असे म्हणतात.
डोळे आले असता,डोळे लाल होणे,डोळ्यातुन सतत घाण येणे,खाजणे,आग होणे सुजणे अशा तक्रारी अचानक सुरु होतात.
काही जणांना अचानक डोळ्यात काहीतरी गेल्याप्रमाणे टोचु लागते.
ही लक्षणे कमीअधिक असु शकतात .कधी एकाच डोळ्याला तर कधी दोन्ही डोळ्याला त्रास होतो.
ऋतु बदलताना किवा यात्रा ,मेळे अशा गर्दीच्या ठिकाणी डोळे येण्याची साथ येते.
बॅक्टेरिया (जिवाणु) किंवा विषाणु( व्हायरस) मुळे डोळे येतात. यापैकी विषाणुंमुळे येणारी साथ झपाट्याने पसरते.कारण त्यांचा प्रसार हवेमार्फत पटकन होतो. याशिवाय स्पर्श,निकटचा सहवास,वस्तुंची देवाणघेवाण किवा वापर यामुळेही संसर्ग होऊन डोळे येतात.
डोळे येताना दिसणारी लक्षणे डोळ्याच्या इतर गंभीर आजारातही दिसुन येतात.डोळे आलेत असे वाटुन घरगुती इलाज करत राहिल्यास दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो,म्हणुन वरील लक्षणे दिसली तरी घरगुती उपचार न करता नेत्रतज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
यातील (बॅक्टेरिया)जिवाणुमुळे डोळे आले असतील तर एंटिबायोटिक ड्रॉपने ते लवकर बरे होतात. पण ( व्हायरस) विषाणुंमुळे डोळे आलेले असतील तर त्यावर ठोस असे औषध नाही. स्टिरॉईड ड्रॉपने त्वरित आराम वाटतो, पण त्यामुळे डोळे पूर्ण बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो,तसेच कॉर्निया या डोळ्याच्या पडद्यावर पांढरे डाग पडुन नजरही खराब होऊ शकते. (स्वत:च केमिस्टना विचारुन ड्रॉप घातले की ते बहुधा स्टिरॉईडच असतात). डोळे आलेले असताना स्टिरॉईड ड्रॉप घालू नये.
डॉ.आफळे आय हॉस्पिटल मधे डॉ आफळे डोळे येण्यावर अत्यंत सुरक्षित अशीच ट्रीटमेंट देतात ज्याने पेशंटला लवकर आराम तर पडतोच पण डोळ्याला इजा होत नाही.
डोळे आलेले असताना खालील काळजी घ्यावी.
डोळ्याला हात,रुमाल लाऊन चोळु नये.
डोळ्यातील घाण नॉर्मल पाण्याने धुवुन टाकावी.
गॉगल लावावा.
गर्दीची ठिकाणे टाळावी.
आपला रुमाल,टॉवेल,साबण वेगळा ठेवावा.
नेत्रतज्ञानी दिलेली औषधेच घालावी.
लेसिक संबंधी काही प्रश्नोत्तरे.
लेसिक ऑपरेशन म्हणजे काय?
एक्सायमर लेझरने डोळ्याच्या पुढच्या पडद्याचा आकार बदलुन चष्म्याचा नंबर घालवण्याच्या ऑपरेशनला लेसिक ऑपरेशन म्हणतात.
हे ऑपरेशन कोणाचेही होऊ शकते का?
नाही.नेत्रतज्ञ डोळ्याची पूर्ण तपासणी केल्यावरच ठरवु शकतात की हे ऑपरेशन पेशंटसाठी योग्य व सुरक्षित आहे का.तसे असेल तरच ते केले जाते.
कोणत्या वयात लेसिक ऑपरेशन करता येते?
18 ते 21 वर्षापर्यंत चष्म्याचा नंबर स्थिर होतो.त्यानंतर हे ऑपरेशन करता येते. वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत करता येते.
किती पर्यंत चष्म्याचा नंबर जाऊ शकतो?
मायनस नंबर असेल व पारपटलाची जाडी पुरेशी असेल तर -9,-10 पर्यंत नंबर घालवता येतो.अस्टिग्मँटिझम असेल तर -4 पर्यंत सिलिंड्रिकल नंबर घालवता येतो.
प्लस नंबर असेल तर +4 पर्यंत नंबर जातो.( केसप्रमाणे बदल होऊ शकतो.)
कोणती भूल दिली जाते?
डोळ्यात भूलेचे ड्रॉप घातले जातात.
ऑपरेशन करताना दुखते का?
जाणीव होते,थोडासा त्रास होऊ शकतो,पण विशेष दुखत नाही.
सर्जरीला किती वेळ लागतो?
दोन्ही डोळ्याला मिळुन 15 ते 20 मिनिटे.
दोन्ही डोळयांच एकदमच ऑपरेशन करतात का?
होय,एकापाठोपाठ .
काँटेक्ट लेंसेस लावणे कधी बंद करावे?
ऑपरेशनच्या आधी 15 दिवस.
ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यावी लागते?
मुख्यात: डोळ्याला कशानेही स्पर्श न करणे व डोळे न चोळणे हे महत्वाचे.
काही दिवस तोंड व केस धुवु नये.
ऑपरेशननंतर दुखते का?
फारसे नाही.
काळा चष्मा लावावा लागतो का?
नाही.साधा पारदर्शक सुरक्षा चष्मा चालतो.
नाँर्मल कामे कधी चालु करु शकतो?
टीव्ही,वाचन ,स्वयंपाक हे सर्व दुसऱ्या दिवशीही थोडेफार चालु करु शकता.
लेसिक अॉपरेशन
काही प्रश्नोत्तरे
लेसिक अॉपरेशन म्हणजे काय?
एक्सायमर लेझरने डोळ्याच्या पुढच्या पडद्याचा आकार बदलुन चष्म्याचा नंबर घालवण्याच्या अॉपरेशनला लेसिक अॉपरेशन म्हणतात.
हे अॉपरेशन कोणाचेही होऊ शकते का?
नाही.नेत्रतज्ञ डोळ्याची पूर्ण तपासणी केल्यावरच ठरवु शकतात की हे अॉपरेशन पेशंटसाठी योग्य व सुरक्षित आहे का.तसे असेल तरच ते केले जाते.
कोणत्या वयात लेसिक अॉपरेशन करता येते?
18 ते 21 वर्षापर्यंत चष्म्याचा नंबर स्थिर होतो.त्यानंतर हे अॉपरेशन करता येते. वयाच्या 45 ते 50 पर्यंत करता येते.
किती पर्यंत चष्म्याचा नंबर जाऊ शकतो?
मायनस नंबर असेल व पारपटलाची जाडी पुरेशी असेल तर -9,-10 पर्यंत नंबर घालवता येतो.अस्टिग्मँटिझम असेल तर -4 पर्यंत सिलिंड्रिकल नंबर घालवता येतो.
प्लस नंबर असेल तर +4 पर्यंत नंबर जातो.
कोणती भूल दिली जाते?
डोळ्यात भूलेचे ड्रॉप घातले जातात.
अॉपरेशन करताना दुखते का?
जाणीव होते,थोडासा त्रास होऊ शकतो,पण विशेष दुखत नाही.
सर्जरीला किती वेळ लागतो?
दोन्दी डोळ्याला मिळुन 15 ते 20 मिनिटे.
दोन्ही डोळयांच एकदमच अॉपरेशन करतात का?
होय,एकापाठोपाठ .
काँटेक्ट लेंसेस लावणे कधी बंद करावे.
अॉपरेशनच्या आधी 15 दिवस.
अॉपरेशन नंतर काय काळजी घ्यावी लागते?
मुख्यात: डोळ्याला कशानेही स्पर्श न करणे व डोळे न चोळणे हे महत्वाचे.
काही दिवस तोंड व केस धुवु नये.
अॉपरेशननंतर दुखते का?
फारसे नाही.
काळा चष्मा लावावा लागतो का?
नाही.साधा पारदर्शक सुरक्षा चष्मा चालतो.
नाँर्मल कामे कधी चालु करु शकतो?
टीव्ही,वाचन ,स्वयंपाक हे सर्व दुसऱ्या दिवशीही थोडेफार चालु करु शकता.
नेहमीचे काम ,अभ्यास,ऑफिसचे काम( काँप्युटरवर) 3 दिवसानंतर चालु करु शकता.
किती दिवस सुट्टी घ्यावी लागते?
3 ते 4 दिवस पुरे.
ऑपरेशननंतर स्वयंपाक करायला कधी सुरु करावा?
3 दिवसानंतर.
खाण्यापिण्यावर काही बंधन आहे का?
नाही.
नंबर कायमचा जातो का?
होय.
जवळचा नंबर जातो का?
नाही. 40 वर्षे वयानंतर जवळचा नंबर लागु शकतो.
या ऑपरेशन दरम्यान डोळ्यात लेन्स बसवली जाते का?
नाही.
लेसिक सर्जरी करणे सुरक्षितस नसेल तर दुसऱ्या काही इलाजाने नंबर घालवता येतो का?
होय.डोळ्यात लेन्स इंप्लांट करता येते किंवा डोळ्यातील नैसर्गिक लेन्स बदलता येते.
लेसिक ऑपरेशन झाल्यावर किती दिवसांनी दिसु लागते?
दुसऱ्याच दिवसापासुन बिन चष्म्याचे दिसु लागते.
लेसिक सर्जरी सुरक्षित आहे का?
योग्य त्या तपासण्या करुन त्यानुसार निर्णय घेऊन जर केली व नंतरही योग्य काळजी घेतली तर कोणत्याही इतर ऑपरेशनप्रमाणे ही सर्जरीही सुरक्षित आहे.
लेसिक ऑपरेशननंतर दृष्टी जाऊ शकते का?
हल्लीच्या नवीन तंत्रज्ञानाने व पुरेशा अनुभवाने नजर जाणे ही गोष्ट क्वचितच होऊ शकते.
डॉ.आफळे गेली 15 वर्षे यशस्वीपणे लेसिक ऑपरेशन करत आहेत.डोळ्याच्या संपूर्ण तपासणीनंतरच ऑपरेशन करावे की नाही याबद्दल सुरक्षित असा योग्य सल्ला दिला जातो.
लेसिकने शक्य नसेल तर लेन्स इंप्लांट करुनही नंबर घालवता येतो.
आपले डोळे इतर त्वचेच्या मानाने किंचित ओलसर असतात ही गोष्ट सर्वांना माहितच आहे.रडु आले किंवा डोळ्यात काही गेले तर डोळ्यातुन घळाघळा पाणी येऊ लागते हेही सर्वश्रुत आहे. डोळ्यात भुवईच्या मागे,हाडाच्या पोकळीत अश्रुपिंड असते. तिथुन अश्रु सतत तयार होत असतात.ते डोळा ओलसर ठेवण्याचे काम करतात व केशाकर्षणाने नाकाच्या पोकळीत वाहुन जातात.नाकातुन ते घशात जातात.म्हणुनच डोळ्यात घातलेले औषध घशात येऊन कडु लागते.
डोळ्यातले पाणी नाकात जाताना प्रथम ते एका छोट्याशा पिशवीत साठवले जाते.ही पिशवी डोळा व नाकाच्या मधे जी जागा असते तिथे आत असते. या पिशवीला लासरु किवा अश्रुची पिशवी म्हणतात.या पिशवीत काही काळ अश्रु साठवले जातात व नंतर एका लहानशा नळीमार्फत नाकात वाहुन नेले जातात.
डोळ्याला काहीही इजा झाली किंवा रडु आले की अश्रुपिंडातुन अतिरिक्त अश्रु निर्माण होतात. व गालावर गळु लागतात तसेच ते नाकातुनही वाहू लागतात.पण सर्वसाधारणपणे नेहमी पुरेसेच अश्रु निर्माण होतात व ते योग्य रितीने नाकात वाहून नेले जातात.
डोळ्यातील अश्रु नाकाकडे वाहुन नेणारा जो मार्ग आहे त्यात कुठेही अडथळा आला की हे पाणी लासरुच्या पिशवीत साठुन राहते.पिशवी भरली की उलट डोळ्यात येते व मग डोळ्यातुन सतत पाणी गळु लागते.
अश्रुच्या नाकात जाणाऱ्या नैसर्गिक मार्गात अडथळा आल्यामुळे सतत डोळ्यातुन पाणी येण्याच्या या आजाराला डेक्रियोसिस्टायटिस असे भले मोठे इंग्रजी नाव आहे.
सतत सर्दी,नाकाचेे विकार,वृद्धापकाळ यामुळे ही नाकातली नळी बंद होते व लासरुच्या पिशवीत पाणी साठुन राहते.
साठलेल्या पाण्यात जंतु वाढु लागतात त्यामुळे डोळ्यातून सतत घाणही येऊ लागते.कधी कधी तेथे गळु होऊन प्रचंड सूज येते व लासरुच्या जागी दुखू लागते.
यावर इलाज म्हणजे ऑपरेशनने अश्रुची पिशवी उघडुन ती नाकाच्या आतील त्वचेला जोडुन टाकणे.डेक्रियोसिस्टोऱ्हायनोस्टोमी किंवा डीसीआर असे या ऑपरेशनचे नाव आहे.
त्यानंतर डोळ्यातले अश्रु या नवीन मार्गाने नाकात वाहून नेले जातात व डोळ्यातून सतत येणारे पाणी बंद होते .तसेच घाणही यायची बंद होते.
डॉ आफळे यांनी हे अवघड ऑपरेशन करुन शेकडो पेशंट बरे केले आहेत.
काही वेळेस ही अश्रुंची पिशवी खराब झालेली असेल तर काढुन टाकावी लागते.मग घाण येणे बंद होते पण पाणी येणे मात्र कमी प्रमाणात चालुच राहते.
वृद्धापकाळी होणारा हा आजार कधी जन्मजातही असु शकतो.
बाळ जन्मेपर्यंत त्याची नाकातील अश्रुवाहक नळी उघडुन पोकळ झालेली असते.काही वेळेस मात्र बाळ जन्मल्यावरही ही नळी उघडत नाही. अशा मुलांना जन्मापासुनच डोळ्यातुन घाण व पाणी येण्याचा त्रास सुरु होतो.डोळ्यात थेंब घातल्यावर तात्पुरता त्रास थांबतो,पण परत चालु होतो.
अशा मुलांच्या डोळ्यात योग्य ते एंटिबायोटिक थेंब घालुन काही दिवस वाट पहावी लागते.नाक व डोळ्याच्या मधे अंगठा ठेवुन "वरुन खाली " मसाज करावा. एक ते दीड वर्षात अश्रुवाहक नळी आपोआप उघडते व डोळ्यातुन पाणी येणे बंद होते.
बाळ दीड दोन वर्षाचे होऊनही जर घाण व पाणी बंद झाले नाही तर बाळाला पूर्ण भुल देऊन अश्रुवाहक नळी उघडण्याचे ऑपरेशन करावे लागते. छोटेसे असलेले हे ऑपरेशन योग्य वयात न केल्यास मात्र पुढे मोठे डीसीआर चे ऑपरेशन करावे लागते .
डॉ आफळे आय हॉस्पिटलमधे लहान मुलांचे हे ऑलरेशन सहजगत्या होते.
खराब होतो.या आजाराला डायबेटिक रेटिनोपथी म्हणतात. रेटिना खराब होत असताना दुखत नाही की त्रास होत नाही.नजर जेव्हा खूप खराब होते तेव्हाच पेशंटच्या लक्षात येते. म्हणुनच डायबेटिक रेटिनोपथीला " सायलेंट किलर ऑफ द व्हिजन" अस म्हणतात.
रेटिना दृष्टीच्या असंख्य चेतापेशींनी बनलेली असते.रेटिनाच्या मध्यबिंदुवर या पेशींचे प्रमाण खूपच असते.त्या महत्वाच्या बिंदूला मेक्युला असे म्हणतात.
रेटिनाच्या चेतापेशींना रेटिनावरील असंख्य केशवाहिन्यामार्फत रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा होतो.
डायबेटिस मधे काही कारणाने या केशवाहिन्या ब्लॉक होतात.त्यामुळे रेटिनावर रक्त व चरबीचे थर जमतात.त्यामुळे दृष्टी खराब होते.जर हे रक्त व चरबीचे थर मेक्युलावर चढले तर दृष्टी फारच खराब होते .
रेटिनाच्या बारिक रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे रेटिनाच्या चेतापेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.त्यामुळे रेटिनावर नवीन रक्तवाहिन्या निर्माण होऊ लागतात.
या रक्तवाहिन्या अत्यंत नाजुक असतात त्यामुळे त्या अचानक फुटुन रेटिनावर किंवा डोळ्याच्या पोकळीत अचानक फुटु शकतात व नजर अचानक किंवा हळुहळु खराब होऊ शकते.
महत्वाच्या गोष्टी-
डायबेटिसमुळे नजर खराब होऊ शकते.
रक्तातली साखर नॉर्मल असली तरी नजर खराब होऊ शकते.
नजर खराब होताना दुखत नाही.
नजर अतिशय हळुहळु खराब होते व रेटिना खराब होते आहे हे सुरवातीला पेशंटला कळतही नाही.
नजर चांगली असली तरी रेटिनावर बराच रक्तस्राव व चरबीचे थर असु शकतात.
जेव्हा डायबेटिक रेटिनोपथीने दृष्टी खराब होते तेव्हा दृष्टी वाचण्याची शक्यता फारच कमी असते.
डायबेटिक रेटिनोपथीपासुन नजर वाचवण्यावर एकमेव उपाय म्हणजे नेत्रतज्ञाकडुन डोळ्याची नियमीत नेत्रतपासणी करणे.( डोळ्यात थेंब घालुन बाहुली मोठी करुन).डॉ.आफळे आय हॉस्पिटलमधे येणाऱ्या प्रत्येक डायबेटिसच्या रुग्णाची डोळ्यात थेंब घालुन रेटिनाची तपासणी केली जाते.
डायबेटिसच्या प्रत्येक रुग्णाला रेटिनोपथी होतेच असे नाही.
रेटिनोपथीची ट्रिटमेंट लेझरने किंवा डोळ्यात इंजेक्शन देऊन करावी लागते.
लेझर ट्रीटमेंटने दुखत नाही,डोळ्यात थेंब घालुन,बसुनच होते.डॉ.आफळे आय हॉस्पिटलमधे ठाण्यातील पहिले ग्रीन लेझर उपलब्ध केले.व आता अत्याधुनिक लेझर मशीन बसवले आहे.
डोळ्यात इंजेक्शन निर्जंतुक ऑपरेशन थेटरमधे दिले जाते. 2 किंवा 3 इंजेक्शनही द्यावी लागतात.आफळे आय हॉस्पिटलमधे सर्वात निर्जंतुक ओ.टी .आहे.
योग्य वेळी डायबेटिक रेटिनोपथीचे निदान व इलाज केला तर डोळ्याची नजर वाचु शकते.
डायबेटिक रेटिनोपथीपासुन नजर वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेटिनाची नेत्रतज्ञाकडुन नियमीत नेत्रतपासणीव वेळीच इलाज.
बराच वेळ काँप्युटर वापरणाऱ्यांना डोळ्याच्या कोरडेपणाचा त्रास होतो. सतत कामात असल्याने नैसर्गिक रित्या डोळ्यांची उघडझाप होत नाही ,त्यामुळे डोळे कोरडे पडतात व नंतर बरेच त्रास सुरु होतात.म्हणुन लक्षात ठेऊन डोळ्याची उघडझाप करा.
सतत स्क्रीनकडे पाहून डोळ्यावर ताण येतो ,तो दूर नजर लावल्यावर कमी होतो.म्हणुन मधुन मधुन दूरच्या वस्तुकडे पहा.दर 20 मिनिटांनी 20 सेकंद दूर पाहा.
एसी चा वारा सरळ डोळ्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
स्क्रीनचा कोन,डोळ्यापासुन अंतर व उंची नीट समायोजित(adjust) करा,म्हणजे डोळ्यावर व मानेवर ताण येणार नाही. स्क्रीनचे डोळ्यापासुन सव्वा ते दीड फूट अंतर योग्य होय.
स्क्रीनचा प्रकाश व अक्षरांचा आकार समायोजित (adjust) करा.
सतत बसुन काम असेल तर
दर 2 तासांनी पाय मोकळे करा.
भरपूर पाणी प्या.
घरचे,पौष्टिक अन्न वेळेवर खा.डोळे,मेंदू यांना योग्य पोषणाची गरज असते.
वर्षातून एकदा नेत्रतज्ञा कडून नेत्रतपासणी करुन घ्या.व योग्य नंबरचा चष्मा लावा.
प्रत्येकाच्या डोळ्यानुसार व काँप्युटरच्या अंतराप्रमाणे योग्य नंबर काढुन प्रोग्रेसिव काचेचा चष्मा उपयुक्त ठरतो.डॉ.आफळे आय हॉस्पिटलमधे डॉ.आफळे पेशंटच्या कामाच्या स्वरुपानुसार व काँप्युटरपासुनच्या अंतरानुसार खास नंबर काढुन देतात.त्यामुळे चाळीशीच्या पुढील लोकांना काँप्युटरवर काम करताना त्रास होत नाही.
डोळे लाल होणे,टोचणे,आग होणे,खाजणे,डोके दुखणे,डोळे दुखणे ,डोळ्यावर सारखे पाणी मारावेसे वाटणे या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये.नेत्रतज्ञाकडे त्वरित जावे.
नियमीत व्यायाम,चौरस आहार,फळे,पालेभाज्या यामुळे डोळ्याची क्षमता वाढेल.कोणत्या ड्रॉपनी नाही.
डोळ्यासाठी कोणता खास व्यायाम नाही पण डोळे चारी बाजुला व गोलाकार फिरवुन व्यायाम करु शकता.
डोळ्यात कोरडेपणा फार असेल तर लुब्रीकेटिंग ड्रॉप्सने बरे वाटेल पण त्यांची सवय करण्यापेक्षा योग्य सवयी लावाव्या.
सर्व तपासुन व काळजी घेऊनही डोके दुखणे थांबत नसेल तर डोकेदुखीची इतर कारणे शोधावी.जसे की सायनस,मायग्रेन,पित्त,रक्तदाब,रक्त कमी असणे,अशक्तपणा,व्यायाम व झोपेचा अभाव.
योग्य काळजा घेतली तर काँप्युटर डोळ्याला कोणतीही कायम स्वरुपी इजा करत नाही.
डोळ्याला कसलाही त्रास न होता, गुपचुपपणे डोळ्याची नजर खराब करणारा आजार म्हणजे काचबिंदु.
रक्ताचे जसे ब्लड प्रेशर असते तसे डोळ्याचेही ठराविक प्रेशर असते. काचबिंदुमधे हे प्रेशर वाढते.याचा पेशंटला काहीच त्रास होत नाही. डोळा ना दुखतो ना लाल होतो,पण अनेक दिवस डोळ्याचे प्रेशर असे वाढलेले राहिल्यामुळे डोळ्याच्या नसेवर दाब येऊ लागतो व नस खराब होते.त्यामुळे
डोळ्याची कडेची नजर खराब होऊ लागते. (field of vision). म्हणजे दुकानात चष्म्याचा नंबर काढायला गेल्यास बरे दिसते ,पण पेरिमेट्री ही विशेष तपासणी केली तर त्या व्यक्तीची बाजुचे दिसण्याची क्षमता खुप कमी झालेली आढळुन येते. डोळ्याचे प्रेशर अर्थातच जास्त असते व डोळ्याची नस तपासली तर ती बरीच खराब झालेली दिसते. वेळीच इलाज केला नाही तर हळुहळु समोरचेही दिसेनासे होते व अंधत्व येते.
रक्ताच्या प्रेशरचा किंवा मानसिक ताणाचा याच्याशी काही संबंध नाही.
काचर्बिंदुचे दोन प्रकार आहेत.
१)क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा - ज्यांना चष्म्याचा जास्त प्लस नंबर आहे अशा मध्यमवयीन,स्थूल स्त्रीयांना हा काचबिंदु होण्याची शक्यता जास्त असते.काही प्रसंगी या पेशंटना डोळा अचानक लाल होऊन प्रचंड दुखण्याचा त्रास होऊ शकतो. (Acute congestive glaucoma).
२)ओपन अँगल ग्लॉकोमा- यात हळुहळु डोळ्याचे प्रेशर वाढत राहुन पेशंटच्या नकळत अंधत्व येते.काहीच त्रास होत नाही. पेशंटला कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो.
क्वचित प्रसंगी काही पेशंटना काचबिंदुमुळे सतत डोके दुखणे,दिव्याभोवती रंगीत कडे दिसणे,जवळचे बघायला त्रास होणे असे त्रास होऊ शकतात.पण त्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते.
मोतीबिंदु व काचबिंदुत फरक आहे. मोतीबिंदुने गेलेली नजर परत येते ,पण काचबिंदूने एकदा नजर खराब झाली की ती पुन्हा येत नाही.म्हणजे काचबिंदुचे निदान लवकर होणे व इलाज लवकर चालु होणे हे आवश्यक ठरते. काचबिंदु झाला तरी डोळ्याला फारसा त्रास होत नाही.नित्याच्या तपासणीत नेत्रतज्ञानी डोळ्याचा दाब, दृष्टिची नस व दृष्टीचे परिक्षेत्र तपासले तरच काचबिंदुचे निदान वेळेत होऊ शकते.
आफळे आय हॉस्पिटलमधे प्रत्येक पेशंटच्या डोळ्याचा दाब तपासला जातो ,तसेच डोळ्याची नसही तपासली जाते.
म्हणुनच प्रत्येक व्यक्तीने वर्षातुन एकदा नेत्रतज्ञाकडुन डोळे तपासुन घ्यायला हवेत.विशेषत:पस्तीस वर्षावरील व्यक्ती,जाड चष्मा असणार्या व्यक्ती व जवळच्या नातेवाईकांना काचबिंदु असलेल्या व्यक्तीनी डोळ्याची काचबिंदुसाठी नियमित तपासणी करुन घ्यावी.
आफळे आय हॉस्पिटलमधे काचबिंदुच्या निदानासाठी सर्व आवश्यक सुविधा आहेत.
काचबिंदुचे वेळीच निदान झाले तर घाबरण्यासारखे काही नाही.काचबिंदुवर ड्रॉपच्या स्वरुपात प्रभावी औषधे आहेत.हे ड्रॉप नियमित घातले की डोळ्याचा दाब नॉर्मल राहतो व द्रुष्टीची नस सुरक्षित राहते.मात्र ड्रॉप घालुन दाब नॉर्मल राहतोय का हे बघणे आवश्यक असते.त्यासाटी डॉक्टरना नियमित भेटणे आवश्यक ठरते. जर या तपासणीत काचबिंदु काबुत नाही असे आढळले तर ड्रॉप बदलावे लागतात.कधी कधी २ते ३ प्रकारचे ड्रॉप घालावे लागतात.
क्वचित प्रसंगी कोणतेच औषध नीट काम करत नाही. असे झाले तर ऑपरेशन करावे लागते.
काही काचबिंदुसाठी लेझर उपचार प्रभावी ठरतो.
मोतीबिंदुला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही पण काचबिंदुला मात्र ऑपरेशन हे शेवटचा उपाय म्हणुन केले जाते.
काही वेळा,काही लोकांना ( क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा)अचानक काचबिंदुचा एटेक येऊ शकतो,अशा वेळी पेशंटला अेडमिट करुन सलाईन लाऊन डोळ्याचा दाब कमी करावा लागतो. या प्रकारच्या काचबिंदुत लेझरचा उपयोग होतो.
कशानेच नियंत्रणात न राहणाऱ्या काचबिंदुसाठी वॉल्व इंप्लांट करावे लागते.
3 ते 13,14 वर्षाच्या मुलांना संध्याकाळी डोळे लाल होणे,
खाजणे,चोळणे,चिकटणे हा त्रास होत असेल तर तो अेलर्जी मुळे होत असु शकतो.
हवेतील धूळ,घरातील माईट्स,किंवा परागकण यासारख्या इतरांना निरुपद्रवी गोष्टीचा काही मुलांना त्रास होतो.त्यांचे शरीर,(डोळे )या साध्या गोष्टीवर चुकीची प्रतिक्रीया देते.व त्या गोष्टींच्या संपर्कात आल्यावर डोळे लाल होऊन खाजतात.नॉर्मल माणसाला या गोष्टींच्या संपर्कात येऊनही काहीच त्रास होत नाही.पण ज्याला अँलर्जी आहे त्या व्यक्तीला या गोष्टींच्या संपर्कात आल्यावर अचानक डोळे लाल होणे,खाजणे असा त्रास होतो.यालाच अेलर्जी असे म्हणतात.
बहुधा हवेतील धुळीची किंवा परागकणांची अेलर्जी असते.
अेलर्जीचा एटेक प्रत्येक वर्षी विशिष्ट ऋतुमधे येतो किंवा काही मुलांना वर्षभर त्रास होतो.
अेलर्जी ही शरिरातुनच येणारी चुकीची प्रतिक्रीया असल्याने ती नियंत्रित करता येते, पण पूर्ण बरी करता येईलच असे नाही.
नवीन नवीन उत्तम औषधोपतचाराने पेशंटला आराम मिळु शकतो.
पण औषधोपचार काटेकोरपणाने व नियमीतपणे नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने घेतला पाहिजे.आपल्याच मनाने औषधे परत परत वापरु नयेत किंवा चालु ठेवु नयेत.
अँलर्जीमुळे नजरेला काही धोका सहसा होत नाही पण अनियमीत व आपलेआपण औषधे वापरल्याने मात्र मोतीबिंदु,काचबिंदु होऊ शकतो.
प्रत्येक वेळी डोळे लाल झाले की नेत्रतज्ञ डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे.ते शक्य नसेल तर काही करु नये,पण स्वत:ची स्वत:,अथवा केमिस्टच्या सल्ल्याने औषधे घेऊन वापरु नये.
अेलर्जी नक्की कशाची आहे ते शोधणे विशिष्ट टेस्टिंगशिवाय शक्य नाही.व बरेचदा ज्याची अेलर्जी आहे ती वस्तुू पू्र्णत: टाळणेही शक्य नसते.
तेव्हा अेलर्जीची तीव्रता कमी करण्यासाठी खालील गोष्टी करुन बघाव्या.
वारंवार डोळे धूणे
धुळीत व उन्हात न जाणे.
पेशंटसमोर घरात सफाई न करणे, धूळ न उडू देणे.
अंधरुण पांघरुण वरचेवर स्वच्छ धूणे.
स्वच्छ गाद्या व उशा वापरणे.
बाहेर जाताना गॉगल वापरणे.
डोळ्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवणे.
डोळे चोळणे मात्र आजिबात टाळावे.कारण जोरजोरात डोळे चोळल्यामुळे डोळ्याच्या नाजुक भागाला इजा होऊन नजरेवर परिणाम होऊ शकतो.
अेलर्जी बरोबरच चष्म्याचा नंबर असु शकतो.डोळ्याला अेलर्जीतुन थोडा आराम पडला की तो तपासून योग्य नंबरचा चष्मा लावावा.
डॉ आफळे आय हॉस्पिटलमधे आधुनिक औषधोपचाराने अेलर्जीवर खूप चांगला इलाज होतो.
बहुधा अँलर्जी वषाच्या 13,14 वर्षापर्यंत आपोआप बरी होऊन जाते.